मनाचे श्लोक ६ वा ( नको रे मना क्रोध हा खेदकारी )


नको रे मना क्रोध हा खेदकारी |

नको रे मना काम नाना विकारी |

नको रे मना लोभ हा अंगिकारु |

नको रे मना मत्सरु दंभ भारु |

जय जय रघुवीर समर्थ.

आपण आध्यात्मिक प्रवचनामध्ये नेहमी ही गोष्ट ऐकत असतो .ते म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सहा शत्रु (षडरिपू ) आहेत. या सहा शत्रुंना आपण मारल पाहीजे संपवला पाहीजे तरच आपली आध्यात्मिक प्रगती होणार आहे. ही गोष्ट काही प्रमाणावर तात्विकता खरी पण आहे.पण समर्थानी आध्यात्म आणि व्यवहार याची इतकि सुंदर सांगड घातली.ते म्हणतात.आयुष्यामधुन क्रोध, काम हे सगळ काढूनच टाकल तर त्या आयुष्याची लोकांच्या दृष्टिन काही किंमतच रहानार नाही. तेव्हा हे सगळे *विकार संपवायचे नाहीत.मारायचे नाहीत तर योग्य पध्दतीन वापरायचे* अशा पध्दतीचे मार्गदर्शन या ठिकाणी समर्थ करतात. म्हणुन आपल्या आयुष्यात क्रोधच नको अस समर्थ सांगत नाहीत.
*नको रे मना क्रोध हा खेदकारी*
जे रागावल्यामुळे खेद करावा लागेल अस  रागावु नकोस.रागवन्याचे दोन प्रकार आसतात.मी नापास झालो मला  इतका राग आला-इतका राग आला मी माझी सगळी वह्या पुस्तक फाडून टाकली.हे ही रागाचच स्वरूप आहे आणि मी नापास झाल्यावर मला इतका राग आला की, मी कसा नापास झालो? म्हणुन मी असा  अभ्यास  केला-असा आभ्यास केला पुढल्या वर्षी पहिलाच आलो.हे ही रागाच स्वरूप आहे.पण हा राग कसा आहे? हा हितकारी आहे.हा खेदकारी नाहिये.तेव्हा *माणसांनी  रागवायला हरकत नाही पण कस रागवाव? की ज्याच्यातून त्याची प्रगति होईल.त्या रागवर त्याची इर्षा मोठ होण्याची पाहीजे* म्हणुन *खेदकारी क्रोध नको* 
*नको रे मना क्रोध हा खेदकारी*
आणि पुढे ते म्हणतात.
*नको रे मना काम नाना विकारी*
काम या शब्दाचा सरळ शास्त्रा प्रमाणे अर्थ काही तरी हव (पाहिजे ) असा   आहे .आपल्या कडे नाहिका आपल्या समोर येऊन नुसताच उभा राहिला आपल्या कडे पहात राहिला तर आपण विचारतो." काय हो काय *काम* आहे " *काम या शब्दाचा अर्थ त्याला काही तरी हवस वाटन* आपल्याला ते हवस वाटन या मध्ये दोष नाही.पण ज्याच्या मुळे ते पुर्ण करण्यासाठी विकाराच्या आधिन व्हाव लागेल अस  काही मनात असू नये.मोठ शास्त्रज्ञ व्हायच होऊ देना. मला मोठ डाक्टर व्हायचय होऊ देना. मला एखादा पुण्यात्मा  व्हायच होऊ देन. मला अस  व्हावस वाटन हे वाईट नाही.पण या दृष्टिन ज्यान विकार जडतील असा काम  अशा कामना मनात येता कामा नये   किंवा आल्या तरी त्या धरून  ठेवता कामा नये .याच्यापुढे तिसऱ्या ओळी मध्ये काही ठिकाणी पाठभेद असा आहे.
*नको रे मदा सर्वदा अंगिकारु*
अशा रीतिन काही ठिकाणी म्हटल जात पण "मद" या शब्दाचा अर्थ अनेकांना माहीत आहे तो बरोबर ही आहे.मद म्हणजे ताठा अहंकार पण 
*नको रे मदा सर्वथा अंगिकारु*
म्हणजे सगळ्या वेळेला नको पण काही-काही वेळेला चालेल.असा काही विपरीत अर्थ  होऊ शकतो.त्या मुळे त्याची मुळ प्रत अशीच आहे की
 *नको रे मना लोभ हा अंगिकरु*
सगळ्या जगातल्या सुख गोष्टी मलाच मिळाल्या पाहीजे .हे सगळ मलाच मिळाल पाहीजे.अस  सारख वाटन याला लोभ अस  म्हणतात.तेव्हा हा लोभ बाळगू नकोस.कारण लोभ बाळगला त्यानि काय होणार आहे? अनावश्यक गोष्टी किंवा तुझ्या आवाक्यात नसलेल्या गोष्टीची कामना केलिस आणि त्या जर नाही पुर्ण झाल्या तर काय? त्याच्या बद्दल  तुझ्या मनामध्ये मत्सर निर्माण होईल म्हणुन तो मत्सर फार भयानक आहे बाबा.
*नको रे मना मत्सरु दंभ भारु*
मत्सर आल्यानंतर आणखीन एक रोग आपल्याला येतो.तो म्हणजे "दंभ" *दंभ या शब्दाचा अर्थ मी जसा नाही तसा आहे  अस  दाखवन म्हणजे दंभ* हा दंभिकपणा आपल्या अंगात येतो.तेव्हा हे *काम, क्रोध, लोभ, मोह हे जे काही असतील ते भगवंताच्य प्राप्तिसाठी म्हणुन वापरावे.
ऐहिकाच्या प्राप्ति करता त्याला गुंतवु नये मग म्हणजे ते आपल्याला अहितकारक होत नाही* अशा रीतिन सहा विकारांना उत्कृष्ट तर्हेन कस वापराव? कस वागवाव? याच आपल्याला मार्गदर्शन या श्लोका मध्ये समर्थ रामदास स्वामींनी केलय

|| जय जयरघुवीर समर्थ ||
थोडे नवीन जरा जुने