मना पापसंकल्प सोडुनि द्यावा |
मना सत्य संकल्प जीवी धरावा |
मना कल्पना ते नको विषयांची |
विकारे घडो हो जनीं सर्व ची ची |
जय जय रघुवीर समर्थ.
भक्ति मार्गानी वाटचाल करताना माणसांनी व्यवहारात सुध्दा कस वागल पाहीजे?
याच्या बद्दल समर्थ आपल्याला मार्गदर्शन करताय.ते म्हणतात.
*मना पाप संकल्प सोडूंनि द्यावा*
मना मध्ये पाप संकल्प येत नाही अस नाही किंवा ते येणार नाही अस ही नाही.पण समजा आलाच तर तो धरून ठेऊ नये.तो पटकन सोडुन द्यावा. अहो पाप संकल्प तर राहू दे कित्येक लोकांच्या डोक्यामध्ये तर व्यर्थ संकल्प आहेत.
आमच्या परिचयाचे एक महाराज गृहस्थ असे होते कि,त्यांनी एक छोटी गाय आणली होती.तिला नुकतीच गोलाकार शिंग तयार होत होती.यांच्या डोक्यामध्ये संकल्प काय? तर या पुर्ण जुळलेल्या शिंगामध्ये आपल डोक नेमक घालायच.मग त्यानी काय उपद्व्याप केले तिच्या शिंगाच माप घेतल आपल्या स्वःहाच्या डोक्याच माप घेतल . सगळे माणस बाहेर गेल्यावर विद्वान गोठ्यात शिरले .ते शिंगात डोक घातल, ते बसल अडकून 😝 आणि त्या गाईन मारला दंनका की हे ईकडून-तिकडे, तिकडून-इकडे हेलपाटे खातय. 😂 शेवटी लोकांनी त्या गाईला पकडल यांच डोक कस बस बाहेर काढल.सगळे घामा घूम झाले. सगळे माणस विचारतात," काय हे, काका हे अविचारान वागण?" काका मोठाले डोळे करुन सांगतात " अविचाराने? अहो गेले चार महीने मी विचार करत होतो." 🤣आता सांगा या असल्या विचार करत बसल्याला काही अर्थ आहे का? मुळात *आयुष्या मध्ये हे सगळे व्यर्थ संकल्प हे टाकले पाहीजे* पाप संकल्प तर टाकलेच पाहीजे.पण अस आहेना. *मन ही गोष्ट अशी आहे की ते रिकामि राहू शकत नाही. काय टाकाव हे सांगतानाच काय घ्याव हेही पटकन समर्थ सांगतात* तेव्हा आपण सुध्दा नीट विचार केला पाहीजे.बऱ्याचशा घरामध्ये पालक मुलांशि वागताना हे असच वागतात की, हे करु नको- ते करु नको. बाळ ही वस्तु अशी आहे की ती रिकामि राहू शकत नाही.मग हे करु नको तर मग काय करु? याचा दुसरा पर्याय पालकत्व या दृष्टिन तुम्ही दिला पाहीजे.त्यांच रिकाम बसन हे आणखिन सैतानाच घर होऊन बसत. तेव्हा मनामध्ये सत्य संकल्प यावा.समोर एखादि सुंदर वसाहत बघितल्या नंतर ही जळताना काय मजा येईल? असा काही तरी पाप संकल्प चुकून मना मध्ये आलाच तर तो सोडुन द्यावा. अशी चांगली घर मी बांधिन असा सत्य संकल्प आपण जीवानात धरावा.पण मग या नंतर समर्थ सांगतात.की जरी मनात चांगल आल तरी सुध्दा काही वेळेला हे सगळ चांगल का करायच? हे माझ्या इंद्रिय विषयांशी कुठ तरी निगडित होत.म्हणजे काय होत? मी आता अनेक घर बांधिन त्या साठी श्रीमंती मिळविन मग अनेक लोकांना आश्रय देईल.मग त्याच्या नंतर माझे सत्कार होतील मग मला केव्हडा मोठा समाजाचा आधार स्तंभ वगैरे म्हणून लोक माझ कौतुक करतील. *माझी स्तुति होन, माझ कौतुक होन ही सुध्दा मानसिक चैनच आहे* या दृष्टिन आपल्या मनामध्ये असा काही सत्य संकल्प करुन चांगल करायची ईच्छा होत असताना
*मना कल्पना ते नको विषयाची*
हा सत्य संकल्प आपले सत्कार व्हावे मला सगळ्यांनी मोठ म्हणाव या साठी करायचा नाहि.कारण अशा अहंकाराच्या विकारानी आपला सत्यसंकल्प प्रेरित झाला तर त्याची सगळ्या लोका मध्ये छि तू होते. सगळी माणस म्हणतात दान-धर्म हे ठीक आहे पण देतो दान पाच रूपयाच आणि जाहिरात करतो पाचशे रुपयांची.
म्हणजे
*विकारे घडे हो जनी सर्व ची ची*
आपल्याला *आपल्या स्तुतिच सुध्दा विकार जडला की कित्येक सत्य संकल्प असे धुळीला मिळुन जातात* म्हणुन समर्थानी या ठिकाणी
*सत्य संकल्प जीवी धरावा* पण आपल्या स्वःहा च्या सुटकारा साठी किंवा आपल्या स्वःहा च्या स्तुतिसाठी ते करु नये. तो विकार आपल्या मनाला येऊ नये अशी मुख्य सुचना समर्थ आपल्याला या ठिकाणी देताय.
|| जय जयरघुवीर समर्थ ||