मनाचे श्लोक ७ वा ( मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावें )


मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावें |

मना बोलणें नीच सोशीत जावे |

स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे |

मना सर्व लोकांसी रे निववा वें |

जय जय रघुवीर समर्थ.

कोणत ही चांगल काम करायला आपण सुरुवात केली  की पहिल्यांदा काय होणार? म्हणजे लोकांकडून निंदा,चेष्टा किंवा टवाळी.तेव्हा मुद्दाम समर्थानी आपण भक्ति मार्गाला जात असताना नामस्मरणाच्या मार्गानी जात असताना सदाचरणाच्या मार्गानि जात असताना एक महत्वाच पथ्य सांगितलय.की बाबा रे तू असा  सदाचारी नुसता वागायला जरी लागलास तरी सुरुवातिला  लोक  तुझी टिंगल करणार.तुझी निंदा करणार."धारिष्ठ" हा शब्द जो आहे.तो धैर्य या शब्दाला पासून आहे.धैर्य आणि शौर्य हे दोन वेगळे शब्द आहे . *शौर्य या शब्दाचा अर्थ आपण शत्रुवर आघात करुन दाखवन आणि धैर्य या शब्दाचा अर्थ शत्रुनि आपल्यावर केलेला आघात आपण सहन करुन दाखवन* म्हणुन या ठिकाणी शौर्य शब्द न वापरता समर्थ मुद्दाम धैर्य  या शब्दावरण येणारा धारिष्ठ हा शब्द वापरतात. तुझ्या वरती निंदाचे, टवाळिचे प्रचंड आघात होतील.म्हणुन 
*मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे*
 जरा आपण सूर्यनमस्कार घालायला लागलो गच्चीवर जाऊन.की शेजार-पाजारची  माणस वेगवेगळ्या पध्दतीन बोलायला लागतात."व्वा.आता म्हणजे अगदि तुम्ही समर्थच होणार वाटत."अशा तर्हेचीऊ टिंगल सुरु होते की दुसऱ्या बाजूनि  "काडी पहीलवान किती का नमस्कार घालिना .अहो  बेंडकी फुगुण बैला सारखी काही होणार नाहिये." कोणत्या ना कोणत्या पध्दतीन आपल मन खच्ची व्हाव आपला संकल्प हेतु सगळा धुळीत मिळावा यासाठी सगळे प्रचंड प्रयत्न करणार.याला पुरुण उरल पाहीजे. समर्थांचा हा स्वःहा चा अनुभव आहे हे लक्षात ठेवा.जेव्हा ते जांब गावाहुन लग्नाचा  मांडव सोडुन टाकळी सारख्या ठिकाणी निघून आले आणि तपश्चर्येला  सुरुवात केलि तेव्हा बारा वर्षाचा हा एक एव्हडासा छोटासा मुलगा एव्हड घोर तप करतोय हे बघुन काहीनी पहिल्यांदा नमस्कार नाही केले. पहिल्यांदा टिंगल टवाळीच केली . समर्थांच्या करुणाष्टका मध्ये त्यांनी  याचा स्वच्छ उल्लेख केलाय. 
"देईना पुरविना कोणी उगेच जन हासति लौकिक राखता येईना बुध्दि दे रघुनायका"
हे रामा,मला सगळे हासतात रे.पण मला इथून जायच नाहीय .माझी तपश्चर्या अर्धवट सोडायची नाहीये.तेव्हा माझी दृष्ठ बुध्दि आहे ती  तशीच ठेव.तशीच राख रघुनायका.आशी प्रार्थना केली  तेव्हा 
*मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे*
आपल्या अनुभवावरून ते सांगतात.की लोक काहीही वाकड तिकड बोलतील.
*मना बोलने नीच शोषित जावे*
आता काही वेळेला माणस म्हणतिल  सारख काय आपण सोसायचच का? आपण बोलायचच नाही का? बोलयच नाही अस  समर्थ नाही म्हणत.म्हणुन तिसऱ्या ओळी मध्ये लगेच त्यांनी उत्तर दिलय.
*स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे*
या एका ओळीत समर्थानी आपल्याला तिन उपदेश केले.जर  आपल्या बद्दल  माणस बोलत असतील तर कोणी बोलावे? माझ्या वतीन तुम्ही बोला हो.अस करु नाही . *स्वये वदावे* तू तिथे जाऊन त्याची तुझी शंका नीरसन कर.किती वेळा सांगायच? दहा वेळा त्यांना सांगितल तरी त्यांना कळत नाही.असा  कंटाळा करु नकोस.त्याला कळे पर्यन्त सांग.म्हणुन *स्वये वदावे सर्वदा वदावे* मात्र एक पथ्य सांगितल समर्थांनी. *नम्रवाचे वदावे* एकदम फटकळ पणे उत्तर देऊ नकोस.नम्रपणे त्याच्याशी बोल. कस बोल? 
*मना सर्व लोकांसी रे निववावे*
ही उपमा आपल्या मराठी माणसांना पटकन कळण्यासारखी आहे.दुधाच पातेल त्याच्या मध्ये जर दूध गरम असेल तर त्याला फ्रिज मध्ये ठेऊन त्याला गार केल तर त्याला "निवल" अस  म्हणत नाही.ते आपण होऊन स्वःहा शांत शांत होत गेल म्हणजे मग त्याला येणारी साय जास्त चांगली असते,गडद असते. जास्त शक्ति त्याच्या मधुन मिळते.ह्या  दृष्टिने  समाजाच्या मनाला सुध्दा अचानक गार करण अचानक गरम करण अस  काही तरी वेडेपणा करु नको. तुझ बोलण अस  चांगल पाहीजे.तुझ समजावून सांगन इतक सुंदर पाहीजे नम्रतेन पाहीजे की त्यामुळे लोकांचि मन अशी  शांत आपोआप निवली पाहीजे. त्या मुळे या समाजाच्या मनावर ही भक्ति ची जी साय तयार होईल ही अधिक शक्तिशाली दिसणार आहे.तेव्हा *साधना करताना काय टिंगल टवाळी होईल ती  सोसावी .योग्य त्या गोष्टीना उत्तर ही द्याव.पण नम्रपने उत्तर देऊन सर्व समाजाच्या मनाला मात्र निववाव* असा सुंदर उपदेश या श्लोका मध्ये समर्थ आपल्याला करतातय.

|| जय जयरघुवीर समर्थ ||

थोडे नवीन जरा जुने