देहे त्यागितां किर्ती मागें उरावी |
मना सज्जना हेचि क्रिया धरावी |
मना चंदनाचे परी त्वां झिजावें |
परी अंतरी सज्जना निववावें ||8||
जय जय रघुवीर समर्थ.
एखाद्या च्या कडून काही काम करुन घ्यायच असेल तर माणस शास्त्र आस सांगत त्याला की त्याला आवडेल अशा एखाद्या वस्तुच आपल्याला त्याला प्रलोभन दाखवता आल पाहीजे.समजा त्या एखाद्या लहान मुलाला कुलकंद जास्त आवडत असेल तर आपण नेहमी काय करतो? त्याच्या कडन एखाद काम करुन घेण्या साठी त्याला ते लालुच दाखवतो.एव्हड काम कर ह.तुला मस्त कुलकंद आणून देइन.तेच माणस शास्त्र या ठिकाणी समर्थानी वापरल आहे.पहा *मनुष्या च्या मनाला तिन इच्छ या असताच* तिन आवडणाऱ्या गोष्टीअसताच.ह्या मला मिळाल्या आस त्याला वाटतच.शास्त्रीय परिभाषे मध्ये याला ईषना आस म्हणतात.एक ईषना असते म्हणजे "धनेषणा".की मला प्रचंड पैसा मिळावा.ही मना मध्ये सारखी ईच्छा असते.दूसरी असते ति "सुखेशना".की मला अनेक सुख उपभोगायला मिळाली पाजिजे.आपण म्हणाल की धनेषणा आणि सुखेशना एकच आहेन? नाही नाही.तस नाही बर.काही लोकांना धन आहे या गोष्टीतच आनंद आसतो.ते सुखा साठी वापरण हे त्यांनच्या डोक्यात नसत.समाजा मध्ये आसे आनेक कोट्याधी आपण बघाल.की जे चपलेचा आंगठा सुध्दा दुरुस्त करत नाही.का?तर खर्च होतो.त्यांच्या कडे प्रचंड पैसा आहे हाच त्यांचा आनंद आहे.पैसे नुसत आसण आशी ईषना असणारे काहीजन आसतात.काही सुखेशना खुप सुखाची साधन उपलब्द व्हावित आसे काही आसतात.आता काही ठिकाणी योग्यान च्या बाबतीत काही साधुन च्या बाबतीत या दोन गोष्टी नाही म्हटल्या तीसरी ईच्छा मात्र सगळ्यांनच्या मना मध्ये 99% लोकांनच्या मना मध्ये असते ति म्हणजे "लोकेषणा".ति म्हणजे लोकांनी माझ्या बध्दल चांगल म्हणाव.एखद्या वेळेला मी लोकांन साठी चांगल करीलच आस नाहि.पण लोकांनी माझ्या बध्दल चांगल म्हटल पाहीजे.आता ही जी माणसांच्या मना मध्ये ईच्छा आहे.ति समर्थांनी ओळखलिय.आणि सगळ्यांना उपदेश करताना सांगितल.अर्थात रूपक आस घेतलय की आपण आपल्या मनाला उपदेश करतोय.हे मना.
*देहे त्यागीता किर्ती मागे उरावी*
तुझा देह जरी गेला तरी तुझ्या बध्दल लोक चांगल बोलतील.आशी तुझी किर्ती तुझ्या मागे उरावी आस तुला वाटतंय ना? मग नाही कोण म्हणेल? वाटतचय.मग समर्थ सांगतात.मग त्यासाठी एक कर.
*मना सज्जना हेचि क्रिया धरावी*
मी सांगतो हेच कर म्हणजे तुझी किर्ती कायम राहील.काय कर?
*मना चंदनाचे परी त्वां झिजावे*
तू चंदना सारखा झिजलास पाहीजे.पण कुणा साठी?
*परी अंतरी सज्जना निववावे*
या जगा मध्ये जे सज्ज्न लोक आहे.साधारण आपल्याला त्याच वर्गीकरण माहीत असत.की दुसऱ्याच्या सुखा साठी स्वःहा च बलिदान देतात.त्याला संत महात्मे या योग्यतेला आपण नेतो ज्याला की "जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति" पण मी सुखात रहातो तुम्ही सुखात रहा.मी तुम्हाला त्रास देत नाही तुम्ही मला त्रास देऊ नका.अशा एक सामाण्य पातळी वर सुध्दा जे जगतात.त्याला सज्ज्न ही म्हटल जात.तेव्हा आशे जे समाजा मध्ये जे सज्ज्न आहेत.त्यांना भय मुक्त करण्या साठी त्यांना दुःख मुक्त करण्या साठी.काही तरी झिजल पाहीजे. या मध्ये झीज् फार महत्वाची आहे बर. म्हणजे शंभर लाडू माझ्या कडे शंभर च्या शंभर काही मला खायला लागणार नाहिचय.दहा लाडवा मध्ये माझी भूक भागनार आहे.नाही तरी नव्वद लाडू शिल्लक पडले होते.देऊन टाकले.पावती करुन घेतली.याला झीज् म्हणत नाही.ठीक आहे ते नव्वद लाडू दिले त्या मुळे कुणाच कल्याण होणार आहे.याच संशय नाही.पण *चंदना परी झिजन* आहे ते त्याच्या मध्ये नाही झाल.समर्थ अपेक्षा आशी करतात. *अध्यात्माची साधना करणाऱ्या साधकान समाजाच्या कल्याणा साठी सुध्दा आपल्या स्वःहा च्या सुखाची झीज होईल आस काही तरी केल पाहीजे* की हे पाच लाडू मला गरजेचे होते यानी माझी भूक भागनार होती.पण मी माझी भूक अर्धवट ठेवली.आणि लोकांनच्या मदति साठी त्याच्यातल्या काही गोष्टी दिल्या.याला जे झिजन म्हणतात अर्थात समर्थांनचा कालखंड असा होता.की माणस मनानी शरीराणि झिजायला तयार होती लढायला तयार होती.पण ते दुष्टानच राज्य चांगल चालाव म्हणुन मारायला तयार होती.समर्थ म्हणतात.दुष्टानचि राज्य राखण्या साठी जे आले आणि मेले त्याची कोण सदकीर्ति गातय? किर्ती कोणाची होते? जे सज्जनान साठी लढले.त्यांची किर्ती होत असते.आपल्या मना मध्ये असाही संशय येईल.की आपल नाव माग शिल्लक रहाव या साठी रामा सारखच वागल पाहीजे आस कुठय? कुंभकर्णा सारख वागायला काय हरकत आहे? पण आपला मुळ मुद्दा असा होता.की आपली किर्ती राहिली पाहीजे.आपल फक्त नाव राहील पाहीजे हा आपला मुद्दाच नव्हता.नाव जरी कुंभकर्ण राहील तर आता कोण कौतुकान आपल्या घरा मध्ये आपल्या पोराच नाव कुंभकर्ण ठेवतय मला सांगा?
कोण आपल्या घरातल्या मुलाच नाव दुर्योधन ठेवत का? नाही ठेवत.नुसत नाव शिल्लक नाही.आपल्या बध्दल लोकांनी चांगल म्हणाव ही जी मनाची ईच्छा आहे.ति आपली ईषना पुर्ण करण्या साठी समर्थानी हा उपदेश केलाय.की *अध्यात्माची साधना करणाऱ्या माणसानि सुध्दा लोकांन च्या साधने साठी लोक कल्याणाच्या साधने साठी थोड़ी झीज घ्यावी आणि त्या योगे आपल नाव आपल्या नंतर सुध्दा सगळे घेतील अशा मांगल्यान भारून टाकाव* असा उवदेश या श्लोका मध्ये सांगितला आहे.
|| जय जय रघुवीर समर्थ ||