मनाचे श्लोक ९वा ( नको रे मना द्रव्य तें पुढिलां चें )


नको रे मना द्रव्य तें पुढिलां चें |

अति स्वार्थबुध्दी न रे पाप सांचे |

घडे भोगणे पाप तें कर्म खोटें |

न होतां मनासारिखें दुःख  मोठे ||9||

जय जय रघुवीर समर्थ.

परमार्थाची साधना करताना श्रीमंति किंवा पैसा एक अडगळ आहे.अशा 
तर्हेन कित्येक ठिकाणी उपदेश केला जातो.पण आपले सर्व संत अतिशय विवेकांनी आस सांगतात की जो पर्यन्त साधकाचे सामाण्य जीवन चालत ते सामाण्य जीवन पुढे योग्य  व्यतीथ होण्या साठी त्याला काही प्रमाणात  द्रव्याची गरज लागनार च आहे.तेव्हा ते नाकारुन नाही चालणार.म्हणुन जगत गुरु तुकोबाराम सुध्दा आपल्या गाथे मध्ये उपदेश करताना सांगतात.की "जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास वीचारे वेचकरी"
*आपल्याला आवश्यक तेव्हड धन पाहीजे त्याला पर्याय नाही.पण हे धन जोडताना उत्तम व्यवहारे आसव* हा मुद्दाम उपदेश तुकीबानी केला.त्याच प्रमाणे समर्थ रामदास स्वामी या ठिकाणी म्हणतातय.की तुला द्रव्य जोडायला काही हरकत नाही.
*नको रे मना द्रव्य ते पुढिलाचे*
म्हणजे दुसऱ्याच्या कष्टाच बळजबरीन हिराउन घेऊन भोगायची ईच्छा आस काही करु नकोस.की "आधी मिळवि मग जेवि" आपल्या संत कथान मध्ये सुध्दा प्रत्यक्ष उदाहरण आहे.की एकनाथ महाराज जेव्हा देवगिरी वर आले. जनार्धन स्वामीना भेटले आणि मग म्हणाले की मला आत्म कल्याणा साठी भगवत दर्शना साठी मला तपश्चर्या करायचीय .तेव्हा त्यांना जी तपश्चर्या होती.ति सांगितली आणि ति करुन ही घेतली.पण या सगळ्या कालखंडात तुम्हाला जो निवास मिळणार आहे मला जे भोजन मिळणार आहे ते आपण फूकट का घ्याव? या दृष्टिन किल्यावर निघालेल काम आपण केल पाहीजे.असा विषय लक्षात घेऊन गडा वरच्या भाजी पल्याचा हिशोब ठेवण्याच काम नाथान कडे दिल्या गेल.आणि ते नाथानी अत्यंत चोख पणे केल पण आहे .अगदि  *साधक अवस्थे मध्ये असताना सुध्दा आपल्याला काही प्रमाणात काही गोष्टी मिळवल्या पाहीजे यात संशय नाही.पण दुसऱ्याच्या कष्टाच आपण घ्याव आस घेऊ नये* आस कुणी केल?आपल्याला महाभारत आठवत असेलच.की जेव्हा कौरवाना स्वःहा च राज्य मिळाल होत जेव्हा पांडव त्यांच त्यांच राज्य करत होते.अशा वेळेला पांडवनि जेव्हा राजसूय यज्ञ केला .त्या यज्ञा मध्ये हे सगळे कौरव गेले त्यावेळेला  यांच्या पोटात दुखायला लागल.का? की जे कष्टानि पांडवनि मिळवल .ते आता फुकटच  आपल्याला कस मिळेल? आस डोक्या मध्ये सगळ विचार चक्र सुरु झाल. यालाच म्हणतात
*अती स्वार्थ बुध्दि* म्हणुन समर्थानी दोन्ही गोष्टी प्राप्त करुन दिल्या आहे.
*नकोरे मना द्रव्य ते पुढिलाचे*
आणि हे दुसऱ्याच आपण लुबाडाव आशा वृत्ति होन 
*अती सार बुध्दि न रे पाप सांचे*
अरे याला बुध्दि काय म्हणतोस हे पाप आहे.का? उद्या ते बुडवल.आपल्याला महाभारत शिकवतयन.की कौरवाणी नी अत्यंत पाप मार्गानि पांडवाच राज्य मिळवल.भोगाव कस लागल?सगळ्या कोरवानचा कुल नाश झाला.मग मला संगा आपल्याला आस विचित्र पध्दतीन भोगाव लागल तर खोट कर्म कशाला करतोस?आणि जर एव्हडी मोठी श्रीमंति मिळवुन दुसऱ्याची श्रीमन्ति मिळवुन लुबाडून आपल्या सगळ्या कुळाचा क्षय च करुन घ्यायचा असेल मग मात्र आपली मुल राज्यवर बसावि 
नातवंड गादी वर बसावित  परतुंड गादिवर बसावित हे जे कही तुमच्या मनात होत.या मना सारख काहीच होणार नाहिये.पुढच्या काळात
*न होता मना सरीखे* मग मात्र दुःख  मोठ आहे.
*न होता मना सारीखे दुःख मोठे*
 स्वःहा च्या मनाचे शुभ संकल्प सुध्दा मातीला मिळतात.का?तर हा नको तो संकल्प मना मध्ये धरू. *अती स्वार्थ बुध्दिने वागलो तर ते  मात्र पाप आपल्याला भोगाव लागत* तेव्हा संसारा साठी आवश्यक द्रव्य सोडायला संतानी कधीच नाही.म्हटलेल नाही. *दुसऱ्याला लुबाडन किंवा दुसऱ्याला फसवुन दुसऱ्याच् द्रव्य घेण तीव्र निषेध या ठिकाणी संतानी केलाय.समर्थानी आपल्या पर्यन्त आनलाय*

|| जय जयरघुवीर समर्थ ||


थोडे नवीन जरा जुने