मनाचे श्लोक श्लोक ३ ( प्रभाते मनी राम चिंतित जावा )


प्रभाते मनी राम चिंतित जावा |

पुढे वैखरी राम आधी वदावा |

सदाचार हा थोर सांडूं नयें तो |

जनी तोचि  तो मानवी धन्य होतो |

जय जय रघुवीर समर्थ.

    आपल आयुष्य सात्विक होण्याच्या दृष्टिन काय काय कराव?
   यासाठी समर्थ रामदास स्वामी आपल्याला एक छान उपदेश करतात,की सकाळी उठल्या बरोबर अगदी प्रारंभालाच मनोमन रामचंद्राची कृतघ्नता पूर्वक पुजा करावी. कारण शेवटी आपण झोपेतुन जागे झालो ते कुणाच्या कृपेमुळे?  हे त्याच्या कृपेमुळे,हे लक्षात ठेवा.कारण, आपण आपल्या जीवनामध्ये  अशा बातम्या  ऐकतो आहोत की झोपायला म्हणुन गेले उठलेच नाहीत. झोपे पर्यन्त तुमची सत्ता आहे पण या झोपेतन आम्ही उठेन का नाही दुसऱ्या दिवशी हे मात्र परमेश्वराची सत्ता ही त्याची ईच्छा आहे.या दृष्टिन आजचा दिवस मला या रामचंद्रानि दाखवल या भगवंतानि मला दाखवला या बध्दल आपण मनोमन पहिल्यांदा त्याचे आभार मानले पाहिजेत. 

"डोळ्यांनी बघतो परीसततो कानी पदी चालतो 
जीव्हेनि रस चाखतो मधुर वाचे  ही  आम्ही बोलतो.
हातानि बहुसाल काम करितो विश्रांती ही घ्यावया 
घेतो झोपि फिरुनी उठतो ही ईश्वराची दया."

आपण पुर्वी लहान पणी हा श्लोक म्हणत होतो.श्लोकाचा अर्थ हा  लक्षात ठेवला पाहीजे.
*प्रभाते मनी राम चिंतित जावा*
आणि या प्रभु रामचंद्राशीे आपल अनुसंधान दिवसभर टिकून राहील पाहीजे.एव्हडया साठी पुढे 
*वैखरी राम आधी वदावा* 
प्रत्येक कामाच्या सुरुवातीला प्रत्येक कार्य सुरु करताना वैखरी म्हणजे जे आपण बोलतो जिथुन शब्द प्रगट होतो.त्या वाणीन रामचंद्राच सातत्यानि उच्चारण चालु ठेवाव.म्हणुन आपल्या कडे किती छान पध्दत प्रचलित आहे .दोन माणस एकमेकांना  भेटलि त्याला अगदि गप्पा जरी मारायच्या आसतील तरी त्या गप्पा मारण्याची सुरुवात कश्यानी होते? तो हात जोडून म्हणतो राम राम.समोरचा म्हणतो राम राम. *रामाच नाव घेऊन तू काम सुरु कर* अगदी दळायला बसल कोणी रामाच्या नावाच्या ओव्या गा.कांडन करायला सुरुवात केल भगवंताच नामस्मरण किंवा भगवंताचे गुणानुवाद चालु द्या.जेवायला जरी बसल 
"जनी भोजणी नाम वाचे वदावे" 
अती आदरे गद्य घोषे म्हणावे"
प्रत्येक कार्याच्या सुरुवातीला जर राम किंवा भगवंताच स्मरण हे सात्यानि केल तर आपल अनुसंधान कायम रहात. याच बरोबर पुन्हा एकदा समर्थ आग्रहानी आठवण करतात.
*सदाचार हा थोर सांडु नये तो*
पण कारण काही भगवंताच नाम मुखात ठेऊन सुध्दा जनावरा सारखे वागतात.तेव्हा याच्या वरूनच म्हण पडली आहे .
"मु मे राम और बगल मे छुरी"
 परमेश्वराच नाव घेऊन समोरच्याला फसवनारी माणस दुर्दैवानी कमी नाहीयेत. म्हणुन त्यांची भक्ति फळाला येऊ शकत नाही.अशी उपासना त्यांची पुर्ण फळाची कृपा प्राप्त करुन देऊ शकत नाही.याची आठवण समर्थ देतातय.
*सदाचार हा थोर तो सांडु नये* 
जगरगुरु तुकोबाराय सुध्दा नेहमी आपल्या अभंगा मध्ये म्हणतात.की 
" ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्ये सांभाळावि " 
नाही तर होत अस,खोकला झाला आहे आणि औषध घेतल आहे.पण त्याच्या बरोबर जर अपथ्य चालु  राहील तर. वाटेल तेव्हडे पेरू खात राहिलो. वाट्टेल तेव्हडया चिंचा खात राहिलो वाट्टेल तेव्हडि बोर खात राहिलो त्या औषधानि काय कराव मला सांगा? या दृष्टिने समर्थ नामस्मरण सांगतात.भगवंताशी अनुसंधान राखण्यासाठी आपण नामोच्चार केला पाहिजे.ही सुरुवात अगदी प्राथमिक भक्ति आपल्याला सांगतात. त्या बरोबरीन सातत्यानि आग्रहानि पटवतात की 
 *सदाचार हा थोर सांडु नये तो*
आणि सदाचाराचे नियम आपल्या डोक्याला येतील असे लावु नये. मला अस वाटल हा सदाचार आहे.मला अस वाटल की हे चांगल आहे याला अर्थ नसतो.मनुष्याच्या बुध्दिला निश्चित पणे काही सीमा आहेत.तेव्हा *परंपरेन अनेक वर्षानुवर्ष जे अनुभवानी सिध्द झालय त्या सदाचारांच्या बद्दल तू आग्रही रहा* तू आपल्या कडून सोडू नकोस.अरे या नुसत्या नामानी,सदाचारानी जरी वागलास तरी सुध्दा तु लोकांमध्ये धन्यता पावशील. पुढे भक्ति मिळाली भगवंत प्राप्त झाला तर जीवन धन्य होईलच पण *सामाण्य नामोच्चाराने सदाचाराने सुध्दा मानसाचं जीवन धन्य होऊ शकत* या इतक्या साध्या छोटया इतक्या सुंदर दोन गोष्टी आहे कारे करत नाहिस्?अशा  काकुळतीन *समर्थ रामदास स्वामी  या श्लोका मध्ये नामस्मरणाच्या बरोबरीन नामच्या अनुसंधानाच्या बरोबरीन सदाचाराच अनुसंधान याच्या बद्दल आपल्याला मार्गदर्शन करतात* तेव्हा निश्चित पणे रामनाम किंवा भगवंत नाम आपण घेता *आपल जीवन सदाचारानी चाललय की नाही याच्या कडे ही आपण थोड कटाक्षान लक्ष देऊ या* आता आणखीन सदाचार सदाचार म्हणजे नक्की काय केल पाहीजे ? कशा कशा कडे लक्ष दिल पाहिजे? याच मार्गदर्शन पुढल्या श्लोका मध्ये स्वामी आपल्याला करणार आहे.तात्पुरता इतकाच अर्थ आपल्या मनामध्ये  असला तरी पुरेसा आहे.

|| जय जयरघुवीर समर्थ ||
थोडे नवीन जरा जुने