मना वासणा दुष्ट कामा नये रे |
मना सर्वथा पाप बुध्दि नको रे |
मना सर्वदा निति सोडूं नको हो |
मना अंतरी सार विचार राहो |
जय जय रघुवीर समर्थ.
प्रत्येक मनुष्याच्या क्रिया या तिन प्रकारच्या असतात.कायिक वाचिक आणि मानसिक.कित्येक क्रिया आपण शरीराने करत नसलो तरी मनानी करतो. तेव्हा आपल्या कोणत्याही क्रियांबद्दल थोड निरक्षण केल तर लक्षात येत की, आधी मनात ईच्छा तयार होते आणि त्याच्या नंतर शरीराकडुन कृती केली जाते.म्हणुन समर्थानी या श्लोका मध्ये फार महत्वाचा मोलाचा संदेश आपल्याला दिला आहे . तो म्हणजे *आपल्या मनामध्ये मुळात ही पाप वासणा यायला नको* आपण मनाच निरक्षण केल तर खरच काही वेळेला इतके भलते विचार आपल्या मनात येतात.त्याच्या वरून एक म्हण पण आहे की " मन चिंति ते वैरी न चिंति "
त्या मनाची भिंती वाटेल अश्या तर्हेचे विचार काही वेळेला मनात येतात. उलट आपल्याकडे संकेत एक असा ही आहे,की मनात जरी वाईट आल म्हणजे पाप वासना आली तरी सुध्दा किमान ती बोलून दाखवु नये.संस्कृति अस सांगते की आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येका वास्तुमध्ये एक 'वास्तु देवता' निवास करते. ती सातत्याने 'तथास्तु' असा आशीर्वाद आपल्याला देत असते.तेव्हा मना मध्ये अशुभ आलच तरी ते किमान मुखा वाटे उच्चारु नये.त्यामुळे कधी आपण मुखा वाटे उच्चारु आणि कधी ती देवता तथास्तु म्हणेल याचा नेम नाही .पुर्वी च्या काळी पंगति बसवल्या जायच्या आणि त्याच्या मध्ये एखादा लहान मुलगा समजा भाजी वाढत वाढत गेला आणि समजा त्याच्या पातेल्यातलि भाजी संपली शेवटच्या माणसाने भाजी मागितली.तर ते पोर पटकन म्हणायच आहो भाजी संपलीय काका.तर घरातली म्हातारी माणस म्हणत भाजी संपली म्हणु नकोस .कारण संपली म्हटलास तर वास्तूदेव तथास्तू म्हणेल .भाजी आहे, फक्त तुझ्या कडचि संपली आहे. मी आणतो अस म्हणायच.म्हणजे बोलण्या मध्ये सुध्दा
संतानी सातत्यानि सकारात्मक विचार दिलाय.तेव्हा. *मुळात पाप वासना येऊ नये,परंतु पाप वासणा आली की मग ती पुर्ण करण्यासाठी तशी पाप बुध्दि तयार होते* म्हणुन मना ही पाप वासणा नको.
*मना सर्वथा पाप बुध्दि नकोरे*
आपल जीवन जगताना आपण धर्म न्याय निति याचा सातत्याने विचार केला पाहीजे.
*मना सर्वथा निति सोडू नको हो*
या ठिकाणी एक पाठ भेद असा आहे की, काही वेळेला काही माणस म्हणतात *मना धर्मता निति सोडूं नको हो* ठीक आहे अर्थामध्ये त्याचा फारस फरक पडत नाही. पण तरी सुध्दा धर्म न्याय निति या बध्दल ची माहिती घे या बद्दल च ज्ञान घे आणि आपल वर्तन त्याच्याशी जोडून बघायचा प्रयत्न कर. अर्थात शेवटच्या चरणा मध्ये समर्थ फार मोलाचा आणखिन एक संदेश देतात.ते म्हणजे
*मना अंतरी सार विचार राहो*
याचा अर्थ असा की, ठीक आहे. मला अशी काही थिल्लर नाटक बघण्याचीच ईच्छा निर्माण झाली.ती माझ्या मनामध्ये पाप वासणा आहे.ठीक आहे.मी ती येऊ दिली नाही किंवा मी ती काढून टाकली. मग त्या कुठल्या तरी थिल्लर फालतू नाटक सिनेमाला जाण्यासाठी कुठून तरी पैसे मिळवायचे होते म्हणुन माझ्या मनामध्ये पाप बुध्दि ही आली होती की कुठून कशे पैसे मिळवू? ठीक आहे ती पण टाकून दिली .मग आता मला धर्म न्याय निति काय सांगते? तर ग्रन्थ वाचन केल पाहीजे चांगल कीर्तन, प्रवचन ऐकल पाहिजे.काही तरी तपश्चर्या नामस्मरण अस आपल्या कडून घडल पाहीजे.ही धर्म कार्य निति आहे पण याच्या नंतर एक *अंतरी सार विचार रहो* याच्या मध्ये समर्थ अस सांगतात.की *धर्माने नितिने अनेक चांगल्या गोष्टी आपल्याला सांगितल्या आहे. अनेक पुण्याईच्या गोष्टी आपल्याला सांगितल्या आहे.पण यातल्या आपल्या प्रकृति ला किती झेपनार आहे? आपल्या तब्यतिल किती मानवणार आहे? याचा विचार केला पाहीजे* नाही तर कोणी अमुक-तमुक व्यक्तिनि ते रोज अकराशे बाराशे गायत्री करतात, आम्ही उगीच बारशे गायत्री करण्याच संकल्प केला.असा वेडेपणा करु नकोस. *स्वःहा च्या प्रकृतिला काय झेपेल? हे लक्षात घेऊन धर्मता कार्य न्यायानी जी असेल असच आचरण माझ्या कडून व्हाव* अशा रीतिन आपल्या मनाला.उपदेश समर्थानी या श्लोका मध्ये केलेला आहे.
|| जय जयरघुवीर समर्थ ||