मनाचे श्लोक १० वा ( सदा सर्वदा प्रीति रामिं धराविं )


सदा सर्वदा प्रीति रामिं धराविं |

सुःखाची  स्वये सांडी जीविं करावी |

देहे दुःख तें सूख मानित जावें |

वीवेकें सदा स्वस्वरूपिं भरावे ||10||

जय जय रघुवीर समर्थ.

सदा सर्वदा प्रीति रामी धरावी
या जगा मध्ये कधीच कुणी कुणावर प्रेम केल नाही असा माणुसच नाही नाही.पण किती ही प्रेम करणाऱ्या सारख्या वस्तु जगात आसल्या तरी सुध्दा त्याच्या प्रेमाच्या व्यक्तिकरणा साठी ते काही मर्यादा आसतात.अमर्यात प्रेम कुणावर कराव? तर त्याच उत्तर एकच आहे.ते फक्त भगवंता वर कराव आणि तरच ते योग्यआहे.
आहो मला जेवन किती ही आवडत असल त्या जेवणा मधला तो पदार्थ ते पक्वान् मला कितीही आवडत असल तरी *सदा सर्वदा* त्याच्यावर प्रेम मला दाखवता येणार आहे का ? दाखवायचा पर्यत केला तरच मग "सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा"
आशी आपली व्यवस्था होऊन बसेल. तस नाही होता कामा. *सदा सर्वदा जर कुणावर प्रेम करायच असेल तर ते माझ्या रामचंद्रा वरति कराव ते* म्हणजे माझ्या ते  परब्रम्हा भगवंता वरति कराव आस या ठिकाणी समर्थान् च सांगन .
एकदा त्याच्यावर प्रेम करायच ठरवलन की आपल ज्याच्या वर प्रेम बसल त्याला मिळवण्याचा आपण प्रयत्न करतोच ना? आणि ते प्राप्त करण्याच आपण पर्यन्तच केला नाही तर मग आपल त्याच्यावर प्रेम आहे किंवा तो मिळवायच या शब्दाला काही अर्थच रहात नाही.
चांगल डाँक्ट होण्यावर आणि त्या मुळे समाज सेवा करण्या वर माझ अत्यंत प्रेम आहे.अ रे पण तू आयुष्यात कधी डाँक्टरच काही शिकलाच नाहिस थोड वैद्यांन कडन औषद कधी जाणून घेतलच नाहीस .कधी कुणावर उपचार करण्याचा प्रयत्न केलाच नाही यातल काहीच नसेल तर नुसत प्रेम आहे या शब्दाला काही अर्थ रहात नाही. *राघवावर प्रेम करण म्हणजे त्याची त्याग वृत्ति वर प्रेम करण आहे* असा हा परब्रम्हा स्वरूप आसणारा हा रामचंद्र तो जर मिळवायचा असेल तर त्याच्या साठी थोडी साधना करावी लागेल.आणि साधना करण्या साठी.आपल्या या प्रपंच्या मधल्या आनेक सुखाला आपल्याला आपण होऊन सोडुन द्याव लागेल.
*सदा सर्वदा प्रित रामी धरावी* मग
*सुखाची स्वये सांड जीवी करावी*
दुसऱ्यान कुणी ते सुख काढून घेण्याची गरज नाही. *स्वये* आपण हुन ति सुख बाजूला केलि पाहीजे.आहो गोष्ट खरिच आहे. *ऐ सी गाडी मध्ये बसून फिरण्याच ते सगळ सुख बाजूला केल्या शिवाय वारीचा आंनद घेता येणार नाही का?* आपल्या यात्रेचा आनंद घेता येणार आहे का? त्या ठिकानचि गैरसोय ही मान्यच केलि आहे.ति माण्य करुन आपण त्या ठिकाणी परब्रम्हा वरच प्रेम व्यक्त करण्या साठी जाणार असू.ज्याच्यावर आपल प्रेम आहे त्या साठी थोडी गैरसोय आपण माण्यच करतोचना.आपल्या व्यवहारा मध्ये आनेक गोष्टी आसतात.की आपल्या प्रिय व्यक्ति साठी आपण किती ही कष्ट घेतले तरी ते कष्ट आपल्याला वाटत नाही.आणि ते कष्ट वाटले नाही तर तरच ति व्यक्तिवर प्रेम आहे.या वाक्याला काही अर्थ रहातो .या दृष्टिन भगवंताच्या साधने साठी आपल्या सगळ्या सुखाची *स्वये सांड जीवाची करावी*
तिसऱ्या ओळी चा आर्थ काही लोक थोडा चुकीचा लावतात.
*देहे दुःख ते सुख मानित जावे*
म्हणजे शरीराला जे दुःख होईल.ते आपण सुख मानाव .मग माणस म्हणतिल आणा एक धोंडा आणा मी तो पायावर मारुन घेतो.मग मला कळा येतील मग मी म्हणेल आहा किती सुख होतय.असा वेडेपणा कुठल्याही संतांनी सांगितलेला नाही.आपल आरोग्य चांगल रहाण्या साठी आपण सगळी पथ्य पळायचीच आहे.सगळे नियम आहे ते पाळायचे आहे. योग्य व्यायाम करायचाय.योग्य तो आहार घ्यायचाय.योग्य ति विश्रांती ही घ्यायचीय .पण ही साधना करत असताना ज्या काही या देहाला जे कष्ट होतात त्या थोडयाशा जाणीवा होतील ते किंवा आनेक पथ्य पाळून सुध्दा एखादा आजार आला.तरी सुध्दा ते सुख मानायला काही हरकत नहीं. आपल्याला एखादा आजार होन  किंवा आपल्याला एखादि वेदना येन हे आपल्या एखाद्या वेळेला पूर्वजन्मि च्या आपल्या पातकाची ची निवृत्ति असते.तेव्हा
*देहे दुःख ते सुख मानित जावे*
पण देह दुःख हे सुख केव्हा मानता येईल? जेव्हा आपल लक्ष त्या परब्रम्हाच्या साधने मध्ये लागल असेल तेव्हा.आणि ते *परब्रम्ह खुप काही लांब नाही .ते खऱ्या अर्थानि ते तुझ स्वरूप आहे.तुझ स्वरूप तेच आहे.तुला तुझाच शोध घ्यायचा आहे* या दृष्टिन 
*विवेके सदा स्व स्वरूपी धरावे*
स्वःहाच्या स्वरूपा कडे जायच आहे.हे ध्यान लक्षात घे.आणि त्या ध्यानावर आपल लक्ष केंद्रित केलस तर मग या साधना मार्गातल्या आनेक देह दुःखला सुध्दा तू सुख समजशील.आणि अशा देह दुःखाला यातना ना सुध्दा स्वीकारुन सहन करुन तू त्याला प्राप्त करण्याच प्रयत्न करत राहिलास. तर मग ते तुझ त्याच्या वर प्रेम आहे  आणि तू  त्याला मिळवण्याचा प्रयत्न करत राहिलास .तर तुझ्या शब्दाला जगात पुढे किंमत शिल्लक राहील.म्हणुन *रामा वरती प्रेम कर?आणि त्याला मिळवण्या साठी काही ही देह कष्ट करावे लागले तरी त्याला डरु नकोस  या तऱ्हेचा असा उपदेश या श्लोका मध्ये समर्थ आपल्याला करतातय*

|| जय जयरघुवीर समर्थ ||
थोडे नवीन जरा जुने