जनी सर्वसूखी असा कोण आहे |
विचारें मना तूचि शोधूनि पाहें |
मना त्वां चि रे पूर्वसंचित केलें |
तयासारिखें भोगणें प्राप्त जलें ||11||
जय जय रघुवीर समर्थ.
आपल्या भारतीय संस्कृति मध्ये एक खुप सुंदर लोककथा आहे.
कथा आशी आहे की एक राजा आसतो.त्याच्या कडे सर्व काही आहे.सत्ता आहे संपत्ति आहे वैभव आहे साम्राज्य आहे त्याच.पण त्याला सुख समाधान आस प्राप्त होत नाहीये.आणि त्याला त्याची जाणीव आहे.की मला जे समाधान पाहीजे की जे सुखी आयुष्य पाहीजे तस नाही मिळतये.म्हणुन त्यानि आपल्या कुलगुरु पुरोहिताना हा प्रश्न केला.की मी सुखी होईल याचा काही तरी मार्ग मला संगा.त्या पुरोहितान च्या लक्षात आल काय घोळ आहे तो.आणि त्या पोरोहितानि त्याला सल्ला दिला.की तुझ्या नगरा मध्ये जो कुणी खुप सुखी असेल त्याचा सदरा तू घातलास की तू सुखी होशील.आणि मग काय महाराज.राजनी आपल्या सगळ्या सेवकाल पिटाळल.की आपल्या नगरा मध्ये कोण सर्व सुखी आहे?त्याला शोधून काढा.सगळे जन या रस्त्यानी त्या रस्त्यानी फिरत रहायचे प्रत्येकाला भेटायचे का रे बाबा तू आहेस का सुखी? तो त्याच्या प्रपंच्यातलि दहा पंधरा कारण सांगायचा नाही हो कुठल सुख आहे हो? आता माझा प्रपंच मी कसाबसा रेटतोय मला हे दुःख आहे ते दुःख आहे.आणि शेवटी त्यातला एक सेवक एक हमाला च्या पाशी येऊन उभा राहतो .तो हमाल जो आहे तो हतगाडी ओढनारा आहे.कष्टा च्या चार भाकरी मिळवल्या की मस्त पैकी खाव दुपारी छान झोप काढावि.सायंकाळी कथा कीर्तन ऐकाव असा सुंदर दिनक्रम आसणारा तो एक हमाल आहे.आणि तो नेमका बिना
सदऱ्याचा आहे.नुसत त्याच धोतर मस्त छान पैकी बांधलेल आणि हतगाडी वरती मस्त पैकी झोपलेला होता.तीथ सेवक बसतो आणि विचारतो कारे बाबा आता काय सगळ्याला तुम्ही सुखी आहात का? तुम्ही सुखी आहात का?प्रश्न विचारले. तर प्रश्न येतोय.सेवकानी याला मुद्दाम उलट विचारल.का रे तुला काही दुःख आहे का? हमाल म्हणाला कसल दुःख? झकास पैकी कष्ट करत आसतो पोटा पुरत मिळवतोय मस्त पैकी खाऊन झोपतोय कथा कीर्तनाला जातोय हँ हँ मी? पुर्ण सुखी आहे.मग तुझा सदरा दे.आमच्या महाराजांना पाहिजेलये.म्हटला मी सदरा घालतच नाही.आता आली का पंचाइत.सगळे सेवक राजा पाशी जाऊन हे सगळ वृत्त सांगतात.आणि तेव्हा राजपुरोहित म्हणतात.बघ राजा. *प्रत्येकाला आयुष्या मध्ये सगळी सुखच आहे आस असुच शकत नाही.सुख दुःख हे सगळ मिश्रितच असणार.त्याला ज्याला दुःख जानवतच नाही त्याचे कष्ट योग्य आहे.प्रामाणिक आहे.त्यामुळे त्याला शरीराच दुःख जाणवत नाही* तेव्हा राजा
*जनी सर्व सुखी असा कोण आहे*
आयुष्यातला प्रत्येक क्षण सुखाचाच आहे असा कोणी नाहिये.
*वीचा रे मना तूचि शोधून पाहे*
आपल मन सुध्दा सारख तक्रार करत असत.की प्रत्येक क्षण आपल्याला सुखाचा का नाही मिळत? का नाही म्हणजे? जगा मध्ये आस आयुष्य आसतच नाही.आणि *आपल्या जीवना मध्ये आलेले संकट किंवा दुःख ही कुणी फारशी दुसऱ्यानी आणलेली नसतात हो* समर्थानी त्याला फार सुंदर त्याला उत्तर दिलाय.
*मना त्वां ची रे पूर्व संचित केले*
*तया सारिखे भोगणे प्राप्त झाले*
इथे काही शब्दान चा अर्थ आपण निश्चित लक्षात घेउया.आपण जे आता करत आसतो त्या कृतिला *क्रियमाण* आस म्हणतात.आपण जे भोगत आसतो त्याला *प्रारब्ध* आस म्हणतात.आणि क्रियमाना मुळे जे तयार झालय पण अजुन भोगायच राहिलय त्याला *संचित* म्हणतात.म्हणुन आपण जेव्हा ठेव ठेवतो त्याला आपण संचित ठेव योजना अशा तऱ्हेची नाव देत आसतो.आणखिन सोप्या शब्दा मध्ये सांगायच तर मी आत्ता काम करतोय आणि पगार मिळवतोय.हे माझ *क्रियमाण* आहे.त्या पगारातलि विशिष्ट रक्कम मी उपभोगतोय ते माझ *प्रारब्ध* चालु आहे.आणि जे मी उपभोगण्या साठी शिल्लक ठेवलय ते माझ *संचित* आहे.आणि आपली संस्कृति परंपरा आस सांगते.की *मनुष्य जन्म जन्म जे जे करत रहातो ते ते काही प्रमाणात भोगतो.आणि कहि प्रमाणात साठवल जात* मग ते पुण्य असो पाप असो पुण्य केल तर चांगल साठत असत
पाप केल असेल तर तेव्हड वाईट साठत जात.आणि मग ते त्या त्या क्रमानि भोगाव लागत.मग आयुष्या मध्ये पुर्वी जे जे काही चांगल केल असेल ते सुखाच्या रूपाने आल जे जे वाईट झाल असेल आपल्या हातून ते ते पातका च्या रूपाने किंवा यातनेच्या रुपान आलअसेल.दुसर कोणी तुला त्रास दिलेला नाही बाळा.तेव्हा जगावर वैतागु नको.लोकांन वर वैतागु नको .विचार कर की जगात सगळ्या पध्दतीन सर्व सुखी असा कोणी नसत.
*मना त्वां ची रे पूर्व संचित केले*
*तया सारिखे भोगणे प्राप्त झाले*
म्हणुन *साधकाने आपल्या जीवना मध्ये आत्ता दुःख आहे याच्या वरती फार विचार न करता फार त्रागा करुन न घेता आत्ता तुझ्या हाता मध्ये काय आहे? तुझ क्रियमाण तुझ्या हातात आहे.तर पुढच जीवन साधकाच यशश्वी कस होईल आस क्रियमाण तू चालु ठेव.की मग तुला पुढच जीवनात तुला अशा दुःखाचा कधी त्रास होणार नाही* समर्थानी फार मोलाचा संदेश हा आपल्याला दिला आहे.तो संदेश लक्षात घेऊन आपण आपल्या जीवनातल्या सुख दुःखा कडे पहाण्याची आपल्या मनाला सवय लावुया.
|| जय जयरघुवीर समर्थ ||